Pages

Saturday, March 27, 2010

विरक्ती आणि सुख दु:ख

सुख हे मानण्यात आहे ... मग ते कशातही मिळू शकेल ... विरक्ती म्हणजे स्थितप्रज्ञता ... अगदी एखाद्या गाढवाप्रमाणे ... जे आंब्याची साल आणि कागद एकाच चवीने खाते.....
पूर्ण विरक्ती प्राप्त झालेल्या माणसास जगातील सुख दु:खाचे काही घेणे देणे नसते ... एक गोष्ट सांगण्याचा मोह टाळता येत नाहीये .... बहुतेक बऱ्याच जणांना माहित असावी ... पण कोणी ना कोणी नवीन वाचणारा असेलच ...

"एकदा एक संन्यासी गुरु आणि शिष्य पायी प्रवास करीत असतात. वाटेत एक नदी लागते. नदीला पूर आलेला असतो. नदीच्या काठावर एक स्त्री रडत बसलेली असते. गुरु तिची विचारपूस करतो. तिला काही अत्यंत महत्वाच्या कामासाठी नदी पार करायची असते, परंतु पुरामुळे तिला ते शक्य नसते ... गुरु तिला म्हणतो "तू माझ्या खांद्यावर बैस मी तुला नदी पार करून देतो ..." त्याप्रमाणे ती त्या संन्यासी गुरूच्या खांद्यावर बसते आणि नदी पार करते.... गुरु शिष्य पुढचा मार्ग धरतात. पण शिष्याच्या मनात नवीन प्रश्न घोळू लागतो . संन्यासी असलेल्या माझ्या गुरूने असे का करावे ??? हा प्रश्न त्याला भेडसावू लागतो. ... चांगले १० १२ मैल चालल्यावर शिष्य गुरूला विचारतो "गुरुजी , आपण संन्यासी लोक , आपल्याला स्त्रीस्पर्ष वर्ज्य ... तरीही तुम्ही त्या स्त्रीला खांद्यावर कसे काय घेतलेत ???" गुरु उत्तर देतात "अरे शिष्या, मी तिला तिथेच नदीपार सोडले ... तू तर तिला इथवर घेऊन आलास "........

या गुरु सारखी विरक्ती मिळणे महाकठीण ... माझ्या म्हणण्याचा मतीत अर्थ असा कि विरक्त माणसाला ना सुख असते ना दु:ख ....

आधी विरक्ती ची गरज का आहे ते पाहू ...
आयुष्यातल्या लहान सहान गोष्टींवरून आनंदी किंवा दु:खी होणारे आपण सर्व भौतिक गोष्टींमध्ये गुरफटलेले आहोत. आपली स्वप्नं, आपली ध्येये आपल्या भोवतालच्या जगाशी निगडीत असतात. परंतु जो मनुष्य ईश्वरप्राप्तीचे ध्येय ठेवतो त्याच्या सुख दु:खाच्या व्याख्या बदलतात. तो भौतिक गोष्टींच्या वर विचार करू लागतो ...
(आता म्हणाल ईश्वरप्राप्ती चे ध्येय च का ठेवावे ??? ... कारण यात चिरंतन समाधान आहे ... जे कधीही कमी होत नाही ...जे भौतिक जाणीवेला कितीतरी मागे सोडते )
(आता विचाराल चिरंतन समाधान म्हणजे सुख च ना ??? तर हो ... ते सुखच ... पण कधीही न संपणारे ... दु:खाचा लवलेश ही न शिवणारे )
आज माझ्या घरी चारचाकी आली ... मला आनंद झाला , माझ्या कुटुंबियांना आनंद झाला .... ही एक भौतिक स्टेप ...
उद्या माझ्या शेजाऱ्याने माझ्यापेक्षा चांगली चारचाकी घेतली ... मला मत्सर वाटला ... ही पण भौतिक स्टेप ... पण जर मलाही आनंद झाला ... तर मी भौतिकता थोडी सोडली आणि विरक्तीच्या दिशेने पावूल टाकले .....
अशीच स्टेप बाय स्टेप प्रगती विरक्ती मध्ये होते ... डायरेक्ट विरक्ती येणे अशक्य ... किंवा गुरूचा अनुग्रह तरी असावा लागतो.
***
परमेश्वर प्राप्तीच्या रस्त्यावर मनुष्यास विरक्ती येते ... पण साक्षात परमेश्वराला विरक्तीची काय गरज ??? तो म्हणाल तर विरक्त म्हणाल तर १६००० स्त्रियांचा पती .... जिथे अर्जुनासारखा नर ईश्वराचे महारूप पाहून गोंधळला तिथे आपण कीस झाड कि पत्ती????


***

स्वामी बाबा बंगाली भूषण

2 comments:

Anonymous said...

mi khuppp vel ghetla ha blog vachyla n samjhayla . but it was worth . khup avadale mala . n patle hi. serv kahi shevti manya karu ter ahe . nahi manya kele ter kahi ch nahi. mi diary madhe aple vichar mandaychi . diary secret one. pen i think blogging is not a bad idea least koni tari samjhun ghetat n ikun ghetat .

Pooja said...

bhushan baba
kadhi yewu tumchyakade shishywrutti ghyaylaa?

hahaha

lekh sunder ahe pn wirakticha arth ajun jaast explain kar..mazyasarkhya lokana....ajun
jaast mahitichi garaj ahe

baaki apratim