आम्ही (म्हणजे सर्व तरुण मंडळी) ३१ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता उठणार. उटणं वैगेरे लावून अंघोळ करणार. मग देवपूजा करणार. सकाळी सकाळी गायीचे सात्विक धारोष्ण दूध ग्लासफुल पिणार. मग पुढचे २ तास ज्ञानेश्वरी पठण. त्यानंतर आई वडिलांच्या पाया पडणार. मग त्यांना घेवून गावातल्या गणपतीच्या मंदिरात देवदर्शनासाठी जाणार. तिथे मोठमोठ्याने अथर्वशीर्ष म्हणणार. गोरगरिबांना दानधर्म करून घरी परत येणार. घरी आल्यावर दुपारचा अल्पोपहार घेणार. साबुदाण्याची खिचडी , २ केळी, ४ खजूर आणि रताळ्याचा शिरा... बास्स!
नंतर घरीच विश्रांती घेवून संध्याकाळी ४ वाजता ह. भ. प. श्री निरंजन महाराज यांच्या प्रवचनाला हजेरी लावणार, ते हि शंकराच्या मंदिरात. संध्याकाळी शुभं करोति म्हणून महाभारताचे पारायण. संध्याकाळी ९ वाजता जेवण. बटाट्याची भाजी , २ चमचे श्रीखंड आणि ४ पुऱ्या. नंतर दूरदर्शनवर रात्री १२ पर्यंत मानवी जीवन आणि त्याचे महत्व या विषयावरील परिसंवाद याचा आस्वाद घेणार. शार्प १२ वाजता आई वडील , बहिण भाऊ , शेजारी पाजारी इत्यादी लोकांच्या पाया पडून त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देणार आणि झोपायला जाणार.
वरील सर्व आम्ही करू , असा तुमचा गोड गैरसमज असेल तर त्वरित दूर करावा , हि नम्र विनंती.
हॅपी न्यू इयर!
*भूषण*